गुन्हेगारांच्या दोषसिद्धीचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. याबाबत पोलिस आयुक्तांनी खंत व्यक्त केली आहे. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर तक्रारदार फितूर झाल्याने गुन्हेगार सुटल्याची ओरड केली जाते. मात्र, अनेकदा तपास अधिकारीदेखील काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडत नाही. पंचनामे, पुरावे, साक्षीदाराचे जबाब, तपास टिपण, मुद्देसूद केलेला तपास या गोष्टीदेखील यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तपासी अधिकार्यांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.