बावडा; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात चालू वर्षी असलेल्या पोषक हवामानामुळे आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर लागला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. सध्या रस्त्यावरून ये-जा करताना मोहोर लागलेली आंब्याची झाडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सायंकाळच्या वेळी मावळतीच्या सूर्यप्रकाशात आंब्याचा मोहोर सोनेरी दिसत असल्याने झाडांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून शेतकर्यांनी बांधावर कृषी विद्यापीठातून आंब्याची रोपे आणून लागवड केली आहे. इंदापूर तालुक्यात आंब्याच्या बागाखालील क्षेत्र अत्यल्प असले, तरी बहुतांशी शेतक-यांचे बांधावर मात्र आंब्यांची दोन-चार झाडे ही हमखास असल्याची माहिती प्रगतशील शेतकरी सागर सावसे (बोराटवाडी), हनुमंत अनपट (लाखेवाडी), एच. के. चव्हाण (भोडणी) यांनी दिली.