महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: कळंब येथे पुणे-नाशिक महामार्गावर वीज वाहक तारांचे चार खांब वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. अनेकदा अपघातही झाले आहेत. महावितरण कंपनीने पोल काढून टाकावेत, अशी मागणी कळंब ग्रामस्थांनी केली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महावितरण कंपनीच्या मंचर व कळंब कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांकडे कळंब ग्रामपंचायतीमार्फत पोल काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला. परंतु महावितरण कंपनीकडून अद्यापही कारवाई झाली नाही. खांब एक वर्षापासून 'जैसे थे' अवस्थेत आहेत. दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीबाबत शाखा अभियंता एस. बी. मुंडे यांनी अडथळा येत असलेले पोल काढण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला आहे, असे सांगितले.