राज्य शासनाकडून गरीब, गरजूंना स्वस्त धान्य विक्री केंद्रांंवर अल्प दरात धान्याचे वितरण केले जाते. शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडणी करण्यात आली असली, तरी शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील व्यक्तींची नावे असतात. त्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेतलेले असतात, इतर प्रमुखांना केंद्रावर गेल्यावर धान्याचा लाभ घेता येत नाही. त्यानुषंगाने मोबाईल क्रमांक जोडणी केल्यावर शिधापत्रिकेतील व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती विक्री केंद्रावर गेल्यास बोटांचा ठसा नसला, तरी जोडणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून धान्याचा लाभ घेता येणार आहे.