Maharashtra Rain: राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने घेतली विश्रांती

Maharashtra Rain Update: राज्यात 15 ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस 29 पर्यंत सुरूच होता.
Maharashtra Rain
राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने घेतली विश्रांती(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुणे: राज्यातील बहुतांश भागांतून मोठा पाऊस शनिवारी थांबला; मात्र पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा भागासह पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत 3 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात 15 ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस 29 पर्यंत सुरूच होता. कोकण, विदर्भात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम, तर मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. गेले पंधरा दिवस पाऊस सुरूच होता. (Latest Pune News)

Maharashtra Rain
Wada Group Reservation: देशमुख, चांभारे, पोखरकर यांचा वाडा गट आरक्षित

शनिवारी 30 ऑगस्ट रोजी राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस थांबला. सकाळीच कडक ऊन पडल्याने गारवा कमी झाला. त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, पुण्यासह कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस 3 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news