

पुणे: राज्यातून मोठ्या पावसाचे अलर्ट क्षीण झाले असून, रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातून पाऊस थांबत आहे. फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत 13 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस काही दिवस सुरू होता. मात्र हवेचे दाब अनुकूल असल्याने राज्यातून मोठा पाऊस कमी होत आहे. प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रविवार (10 ऑगस्ट) पासून कमी होत आहे. या भागातील यलो अलर्ट नाहीसे होत आहेत. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतच 13 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे. (Latest Pune News)