मी खास या सभेसाठी आलो. राहुल गांधी यांनी न्याय मिळवून देण्यासाठी जी भूमिका घेतली आहे, ती मान्य करण्यासारखी आहे. सध्याच्या दूषित वातावरणात द्वेष आणि अहंकार बघायला मिळतोय. विरोधक खोटे बोलण्यात पटाईत आहेत.
– विजय मचाले, नागरिक.
पुण्यात जेव्हा इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हाही मी त्यांच्या सभेला आलो होतो. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या सभेला आलो आहे. देशातील पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वक्तव्याने दुःखी होतोय. काँग्रेसकडून अपेक्षा आहे की, सर्व जाती-धर्माचे लोक एकाजीवाने राहिले पाहिजेत. हा देश सर्व जातीधर्माचा आहे.
– शादुल्ला खान, नागरिक.