माझ्यासाठी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति महत्त्वाची आहे. दादा नाहीत पण आज रोहितही व्यासपीठावर नाही हे लक्षात घेतले पाहिजे असे त्या म्हणाल्या . रोहित पवार हे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीडला गेले आहेत. महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी याचे आव्हान आहे. त्या विरोधात ते संघर्ष करत असून मला त्याचा अभिमान आहे. सगळ्यांचा घराघरात सण साजरा असला तरी महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी तो संघर्ष करतो आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे त्या म्हणाल्या.