याबाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव येथील वन विभागाच्या हद्दीत भीमा नदीपात्रालगत व इतर भागांत वन विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे नदीलगतच्या भागात काटेरी झुडपांचे कुरण आहे, तसेच यामध्ये कडुनिंब व इतर वृक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या क्षेत्रातील वृक्षांची 100 ते 150 लोकांकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. मलठण येथील अंदाजे 5 एकर क्षेत्रातील वृक्ष या लोकांनी मोठ्या संख्येने तोडले आहेत. एवढेच नव्हे तर सुरू असलेल्या चर्चेनुसार त्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचीही त्यांनी कत्तल केली आहे, असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.