त्यानुसार प्रत्यक्षात बूथ लेवलवर प्रत्यक्षात किती टक्के काम झाले, किती टक्के मतदान झाले, पन्नाप्रमुख प्रत्यक्षात किती मतदारांपर्यंत पोहोचले, स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी किती काम केले, मतदारांना मतदानासाठी किती प्रमाणात बाहेर काढले, अशा सर्व बाबींचाही कमिटीने अभ्यास केला असून, त्यानुसार अहवाल प्रदेश पातळीवर पाठविला जाणार आहे. दरम्यान, कोअर कमिटीच्या या अहवालामुळे प्रत्येक भागात कोणी किती काम केले, हे समोर येणार आहे. त्यामुळे काम करण्याचा देखावा करणार्यांचा बुरखा फाटू शकणार आहे. त्याचे परिणाम आगामी काळात होऊ शकतात, असे पक्षातील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकार्याने 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.