

विनोद माझिरे
पिरंगुट: पिरंगुट आणि भुकूम ग््राामपंचायतींकडून कचरा टाकणाऱ्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे आता अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भुगाव ग््राामपंचायतीने यापूर्वी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून कारवाई केली होती. त्यानंतर त्या परिसरातील कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले होते. अशाच प्रकारची कारवाई पिरंगुट आणि भुकूम परिसरातही करण्याची मागणी होत आहे.
घोटावडे फाटा चौकाच्या चारही बाजूंना रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. मुळशीतील सर्व रस्ते कचरामुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, काही नागरिक स्वतःच घरगुती कचरा रस्त्यावर टाकत असल्याची खंत ग््राामपंचायतीने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फळ व भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला जागा व्यापल्याचा आरोप होत आहे. फळ खरेदीसाठी थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पीएमआरडीएकडून कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.