आपल्याकडे बिबटे फारसे हल्ले करत नाहीत; कारण मुळात ते फार घाबरतात. बिबट्या हा प्राणी घाबरट आहे तो सहसा हल्ला करत नाही. पण व्यक्ती एकटा असेल तर कदाचित तो हल्ला करतो. माणसाची गर्दी असेल तर तो हल्ला करत नाही. बिबट्या मनुष्यवस्तीत आल्यानंतर ज्या ठिकाणी भटकी कुत्री असतील त्याठिकाणी तो येतो. कारण त्याला कुत्रे खाणे आवडते. देहूरोड, मुळशी, मावळ, कासारसाई या परिसरात बिबट्याचा वावर आहे. तर, पाचाणे व पुसाणे याठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. वीसपूर्वी निगडीपर्यंत बिबट्या दिसत होते. दुर्गादेवी टेकडीवरदेखील बिबट्या पकडले आहेत. आपल्याला वाटते की बिबट्या मनुष्यवस्तीत आला आहे. पण ते तसे नाही तो त्याच्या जागी बरोबर असतो. मानवाने त्याठिकाणी अतिक्रमण केलेले असते.