उड्डाणपुलाखाली रस्ता अरुंद आहे. फेरीवाले, भाजी विक्रेत्यांसह दुकानदारांच्या अतिक्रमणांचा या रस्त्याला विळखा पडला आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावर रिक्षांसह दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यासह धायरी परिसरातील वाहतूक कोलमडली आहे. याबाबत भाजप ओबीसी आघाडीचे शहर सरचिटणीस अतुल चाकणकर व नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चाकणकर म्हणाले, 'पार्किंग बंद केल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे बस, रिक्षा, अवजड वाहने, तसेच पदचार्यांना अडथळा होत आहे.' खडकवासला मनसेचे अध्यक्ष विजय मते म्हणाले, 'नागरिकांची गैरसोय होत असल्याने पार्किंग पुन्हा सुरू करावे; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव— आंदोलन करण्यात येईल.'