मासिक पाळीबद्दल किशोरवयीन मुलींच्या मनात खूप भीती असते. अशा वेळी आईने मुलींशी मोकळेपणाने संवाद साधावा. मासिक पाळीचे चक्र, स्वच्छता, पॅडचा योग्य वापर याबाबत समजावून सांगावे. घरातील पुरुषांशीही मासिक पाळीतील शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल बोलले गेले पाहिजे.
– डॉ. अरुंधती लिमये, स्त्रीरोगतज्ज्ञ
शहरात मासिक पाळीविषयी ब-यापैकी खुलेपणा आढळून येतो. मात्र, दुर्गम भागांमध्ये आजही भयंकर परिस्थिती आहे. अशा वेळी 'आहे रे' वर्गाने 'नाही रे' वर्गाला हात द्यायला हवा. त्यासाठी समाजबंध संस्थेतर्फे 28 मेपासून भामरागडमधील 20 गावांमध्ये जनजागृतीपर 'सत्याचे प्रयोग' शिबिर सुरू होत आहे. यानिमित्त तेथील महिलांना स्वच्छता, सुरक्षिततेचे महत्त्व समजावून दिले जाणार आहे. याचप्रमाणे आरोग्यतपासणी, पथनाट्य, पॅड वाटप आणि प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जाणार आहेत.
– सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था