

पुणे: राज्यात उष्णतेची लाट सुरूच असून, गुरुवारी सर्वच भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. चंद्रपूर येथे 45 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची जोरदार लाट सक्रिय आहे. राज्यात उष्माघाताने 50 हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे दुपारी 12 ते 5 या वेळेत फिरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
गुरुवारचे कमाल तापमान : चंद्रपूर 45, वर्धा 44.2, यवतमाळ 43.2, अमरावती 44.2, अकोला 44.3, बुलडाणा 41.3, पुणे 39.8, अहिल्यानगर 41.9, नाशिक 38.2, सातारा 39.5, सोलापूर 42.2, मुंबई 36.2.