Maharashtra Cold Wave 2025: राज्यात कडाक्याची थंडी वाढली; अहिल्यानगर 6.6 तर पुणे 7.5 अंशांवर

2019 नंतरचे सर्वात नीचांकी तापमान; उत्तर भारतातून येणाऱ्या झोतवार्याने राज्यभर गारठा
Cold Wave in Maharashtra
Cold Wave in MaharashtraPudhari
Published on
Updated on

पुणेः राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली असून गत पाच वर्षात 2019 नंतर सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरचे किमान तापमान सर्वात कमी 6.6 अंशावर खाली आले होते. उत्तर भारतातून झोतवारा राज्यात येत असल्याने थंडीत वाढ झाली आहे.

Cold Wave in Maharashtra
PMC Election History: ‘पोरी तुला आशीर्वाद… पण मत वकील साहेबांच्या मुलीलाच’ — राजलक्ष्मी भोसले यांचा संघर्षमय राजकीय प्रवास

उत्तर भारतातून झोतवारा (हवेच्या वरच्या थरातील) थंड वारे वेगाने महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील किमान तापमानात 5 ते 7 अंशांनी घट झाली आहे. गुरुवारी राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 10 अंशाखाली गेल्याने राज्याला हुडहुडी भरली.

Cold Wave in Maharashtra
PMC Election Politics: रविवार–नाना पेठ प्रभागात सर्वपक्षीय उमेदवारांची चुरस; ‘खुल्या’ जागेसाठी कांटे की टक्कर

झोतवारा म्हणजे काय...

समुद्रासपाटीपासून दहा ते पंधरा हजार फुट उंचीवर वाऱ्याच्या वरच्या थरात गारवारे वेगाने वाहण्यास सुरुवात झाली आहे. ते वारे उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. हे वारे खालच्या थरांत आले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5 पासूनच राज्य गारठून पारा 6.6 ते 8 अंश इतका खाली आला. त्यामुळे 2019 नंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news