बिबट्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जुन्नरसारख्या भागात तर त्याची मोजदाद नाही. जंगलातील त्यांची गणना काही प्रमाणात शक्य आहे. परंतु, जो बिबट्या जंगल सोडून गावात, शेतात आला आहे, त्याची मोजणी कशी करणाऱ? तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे. तो अत्यंत चपळ प्राणी असल्याने त्याला पकडणे शक्य नाही. त्यामुळे पकडून त्याची नसबंदी करणे, हे अशक्यप्राय वाटते. नसबंदी करायची ठरवली तरी ते अत्यंत महागडे प्रकरण आहे. त्यामुळे बिबट्यांची अंशतः शिकार हाच त्यांची संख्या कमी करण्यावर किंवा त्यांच्या संख्येत मर्यादा घालण्यासाठी उपाय असू शकतो, असे माझे स्पष्ट मत आहे, मी माझ्या पुस्तकांमधूनही हा पर्याय शासनाला वारंवार सुचविला आहे. बिबट्यांची नसबंदी शक्य नाही, हे मी वारंवार सांगतोय. पण, कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. माणसांवर हल्ले होत असतील तर नरभक्षक बिबट्यांची शिकार हाच पर्याय आहे. त्यामुळे गावात हल्ले होत असतील तर अंशतः शिकारीला परवानी दिली पाहिजे. –
डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
माणसावर हल्ला केला तर आम्हाला तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करावा लागतो. त्यानंतर त्या बिबट्याचा शोध घेतला जातो. तो सापडलाच तर त्याला रेस्क्यू केंद्रामध्ये आणावे लागते. बिबट्या आणि जखमी माणूस यांची काळजी घ्यावी लागते. बिबट्यांची नसबंदी हाच योग्य पर्याय वाटतो.
– प्रदीप चव्हाण वनाधिकारी, जुन्नर