बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) 3.76 लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) 59 हजार क्विंटल, खासगी बियाणे कंपन्यांकडून सुमारे 20 लाख 65 हजार क्विंटल मिळून 25 लाख क्विंटल बियाण्यांच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात सोयाबीनव्यतिरिक्त भुईमूग शेंग पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.