Khadakwasla Dam Water Release: पानशेत खोऱ्यात श्रावण सरी; चारही धरणांतून विसर्ग

यामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. १३) पानशेत-वरसगाव खोऱ्यासह घाट माथ्यावर सरी कोसळल्या. यामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.

दिवसभरात वरसगाव येथे १५, पानशेत येथे १३, टेमघर येथे ७ व खडकवासलात १ मिलिमीटर पाऊस पडला. सांडव्यातून जादा पाणी सोडूनही श्रावण सरीमुळे चारही धरणांतील पाण्याची पातळी शंभर टक्क्यांवर स्थिर आहे.

Khadakwasla Dam
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी ५० टक्के भूसंपादनाचा मार्ग मोकळा

वरसगाव धरणातून २ हजार ८८, पानशेतमधून ६०० आणि टेमघरमधून ५२२ क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात १ हजार ९२९ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

याशिवाय शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी १ हजार ६८४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले, की सर्व धरणे भरल्याने पावसाच्या प्रमाणानुसार कमी जास्त पाणी सांडव्यातून सोडले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news