

पुणे : शहरात दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणू लागल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत या फळांची आवक कमी होत असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे दोन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मागणी अभावी पपईच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम राहिल्याने दर टिकून होते.(Latest Pune News)
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि.12) फळबाजारात मोसंबी 60 ते 70 टन, संत्रा 15 ते 20 टन, डाळिंब 40 ते 50 टन, पपई 30 ते 35 टेम्पो, लिंबाची सुमारे एक ते दीड हजार गोणी, किंलगड 5 ते 6 टेम्पो , खरबूज 5 ते 6 टेम्पो, चिक्कू 1 हजार गोणी, पेरु 800 ते 900 क्रेट, अननस 2 ट्रक, बोरे 25 ते 30 पोती, सफरचंद 7 ते 8 हजार बॉक्स तर सिताफळाची 10 ते 15 टन इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रतिगोणी) : 200-450, मोसंबी : (3 डझन) : 100-280, (4 डझन) : 50-120, संत्रा : (10 किलो) : 250-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 90-250, आरक्ता : 20-100, गणेश : 15-50, किंलगड : 10-20, खरबूज : 15- 25, पपई : 8-16, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-400, अननस (1 डझन): 100-500, सिताफळ (1 किलो) : 20-100, बोरे (10 किलो) : चमेली 250-270, चेकनट 700-900, उमराण 50-60, चण्यामण्या 600- 700. सफरचंद (22 ते 25 किलो) : 1000-1800.