पारगाव; पुढारी वृत्तसेवा: डिंभे धरणातून (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) घोड नदीपात्रात जलसंपदा विभागाने सुमारे 22 हजार क्युसेकने पाणी सोडल्याने घोड नदीला पूर आला आहे. घोड नदी दुथडी भरून वेगाने वाहत आहे. यामुळे शेतकर्यांनी, तसेच मच्छिमारांनी पाण्यात उतरू नये, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
गुरुवारी (दि . 15) रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस पडत असल्याने जलसंपदा विभागाने घोड नदीपात्रात 22 हजार क्युसेकने पाणी सोडले. डिंभे धरणदेखील आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, निरगुडसर, चांडोली या गावांमध्ये घोड नदीपात्र तुडुंब भरून वाहत आहे.
शेतकर्यांनी, तसेच मच्छिमारांनी पाण्यात उतरू नये, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.