त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, सिताफळ, पेरु, आवळा, कोकम, फणस, बोर तसेच चिंच, कवठ, जांभुळ, नारळ, लिंबू आणि बांबू, करंज, साग, गिरीपुष्प, सोनचाफा, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा व अन्य फळझाडांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विभागनिहाय स्थिती पाहता लातूर विभागात 4 हजार 900 हेक्टरपैकी 568 हेक्टर (12 टक्के), अमरावती 8 हजार 200 हेक्टरपैकी 2 हजार 400 हेक्टर (30 टक्के), नागपूर विभागात 7 हजार 500 हेक्टरपैकी 1 हजार 760 हेक्टरवर (24 टक्के) फळबाग लागवड झाली आहे.