पुणे : राज्यात रविवारी झालेल्या राजकीय महाभूकंपानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचही आमदार मुंबईत बंडखोर नेते अजित पवार यांच्या सोबत उपस्थित होते. परंतु पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांच्या बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका, जनमत आपल्या विरोधात जाईल यांची धास्ती आणि ज्याच्या त्रासामुळे, ज्या आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यामुळे आतापर्यंत उपेक्षित राहण्याची वेळ आली त्यांनीच अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.