वाल्हे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरणातील बदलाने वाल्हे परिसरात सोमवारी (दि. 30) पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली होती. धुके इतके दाट होते की समोरचे काहीच दिसत नव्हते. मागील आठवड्यात थंडीची तीव्रता कमी झाली होती. मात्र, सोमवारी अचानक थंडीची तीव्रता वाढून वाल्हेकरांनी महाबळेश्वरचा फील अनुभवला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांनी भरपूर फोटोसेशन करीत या धुक्याचे फोटो काढत सोशल मीडियावर टाकले जात होते.
सकाळी व रात्री गारठा आणि दुपारी कडक ऊन, अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या वाल्हे व परिसरात आहेत. गुरुवार (दि. 27) रात्री अवकाळी पडलेला पाऊस, पडणारा गारठा आणि दुपारचे ऊन या बदलत्या वातावरणाचा प्रादुर्भाव शेती पिकावर होणार असल्यान यामुळे बळीराजा देखील चिंताग्रस्त होत आहे.