उरुळी कांचन : पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

उरुळी कांचन : पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

उरुळी कांचन(ता. हवेली); पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन येथे पाण्याच्या टाकीत पडून एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 23) सायंकाळच्या सुमारास खेळता खेळता ही घटना घडली. ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका सदनिकेचे काम सुरू आहे. सदनिकेला पाणी मारण्यासाठी एक पाण्याची टाकी बांधली आहे. याच ठिकाणी ही घटना घडली आहे.

हर्ष जगताप (वय 20 महिने, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन) असे या बाळाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हर्ष खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला. सायंकाळी सातच्या सुमारास तो कुठे दिसून न आल्याने त्याची शोधाशोध सुरू केली. या वेळी तो या टाकीत पडल्याची शंका आली. टाकीत पाहिले असता हर्ष दिसून आला. त्याला तत्काळ उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news