Rahul Gnadhi:जातीनिहाय जनगणनेचे श्रेय राहुल गांधी यांनाच; प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांचे मत

'जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच आहे'
Rahul Gandhi Letter to PM Modi:
Rahul Gandhi Letter to PM Modi: file photo
Published on
Updated on

पुणे: जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी नुकताच येथे बोलताना केला.

जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधीचा विजय आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा फुले वाड्यात तो पेढे वाटून साजरा केला. ’झुकता है मोदी, झुकानेवाला राहुल गांधी चाहिये’, ’सामाजिक न्यायक्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या. प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रशांत सुरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (Latest Pune News)

Rahul Gandhi Letter to PM Modi:
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी करा ऑनलाइन अर्ज; 1 जून 2025 पर्यंत अर्ज स्वीकारणार

जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता गेली 10 वर्षे राहुल गांधी संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते. भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली. पण, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला ही मागणी मान्य करावी लागली. राहुल गांधी हे सतत सर्वसामान्य जनतेची बाजू लावून धरतात, असे मोहन जोशी यांनी या वेळी सांगितले.

अविनाश बागवे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, अ‍ॅड. शाबीर खान, चेतन आगरवाल, रामदास मारणे, सुरेश कांबळे, प्रथमेश आबनावे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अनिता मकवाना, भावना बोराटे, पल्लवी सुरसे आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news