Maharashtra Weather | राज्यात ४८ तासांत थंडीचे आगमन; उत्तर भारत गारठला

किमान तापमानात २ ते ४ अंशाने घट होण्यास सुरुवात
Maharashtra Cold Wave Alert
Maharashtra Cold Wave Alert (Pudhari Photo)
Published on
Updated on

Maharashtra Cold Wave Alert

पुणे: उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने तो भाग गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी ४८ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारताचे कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस वर आहे. त्यात वेगाने घट होत आहे. किमान तापमानात २ ते ४ अंशाने घट होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पाऊस ५ नोव्हेंबर पासून पूर्ण थांबल्यामुळे आगामी ४८ ते ७२ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Cold Wave Alert
kolhapur | येत्या आठवड्यापासून हवामान राहणार ‘ठंडा ठंडा, कूल कूल’

दरम्यान, राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळनंतर हवेत गारवा असे वातावरण गुरुवारी पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत वातावरणात सौम्य बदल झाला असून कमाल तापमान 28.6 अंश तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळी हलका गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर थोडी उष्णता होती. रात्री पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news