रस्त्याच्या कडेला असणार्या इमारती समोर स्थानिक व्यावसायिकांनी पाणीपुरी, भेळ, चहा, स्नॅक सेंटर यांसारखे पथारीवाले आपला व्यवसाय अतिक्रमण करून थाटतात. त्यामुळे इथे येणारे खवय्ये रस्त्याच्या बाजूला कशी ही वाहने उभी करून या ठिकाणी ये-जा करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. परिणामी, या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालक व नागरिकांची दमछाक होत आहे. मुंबई-बंगलूर महामार्गाला लागूनच बाणेर येथील बिटवाईज या कंपनीकडून एक रस्ता पुढे मोहननगर परिसर जातो. हा रस्ता सुस, नांदे, लवळे, मुळशी या भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता असल्यामुळे येथे नेहमीच रहदारी असते.