मात्र, त्यामध्ये रेल्वे बोर्डाला काही त्रुटी आढळल्यामुळे रेल्वे बोर्डाने हा आराखड्याचा प्रस्ताव अंतिम तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला दिला आहे. मध्य रेल्वेकडून आता याबाबतच्या कामाची कार्यवाही सुरू असून, त्यातील त्रुटी दूर केल्यानंतर सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. खोडद येथील जीएमआरटी भागात याची काही समस्या निर्माण झाली आहे. त्यावर अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही. त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. यात मध्य रेल्वे पुढाकार घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.