काळजी घ्या! राज्यात उष्माघाताचे रुग्ण 250 पार..

काळजी घ्या! राज्यात उष्माघाताचे रुग्ण 250 पार..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळी हंगामात राज्यात 1 मार्च ते 14 मे 2024 या कालावधीत उष्माघाताचे 251 रुग्ण आढळले आहेत. जालना (28), नाशिक (27) आणि बुलढाणा (21) या जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अद्याप राज्यात उष्माघाताशी संबंधित कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. निवडणुकीचा हंगाम लक्षात घेता, राज्याच्या आरोग्य विभागाने दुपारच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात मेळावे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आणि गरज भासल्यास अन्न आणि वैद्यकीय मदत सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये योग्य व्यवस्था केली जावी यासाठी सूचना जारी केल्या होत्या.

तथापि, गेल्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणावर लोकांना उष्णतेपासून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे या महिन्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. पुण्यात आतापर्यंत एप्रिल आणि मे महिन्यात उष्माघाताच्या एकूण 10 रुग्णांची नोंद झाली आहे. पावसामुळे अलीकडेच उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नाहीत. दिवसाचे तापमान 40 अंशांच्या खाली आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याने उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित तीव्र निर्जलीकरण होण्याची शक्यता कमी झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news