प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात राबवली जात आहे. गावपातळीवर योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश प्रसाद यांनी दिले आहेत. कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना एकत्रित करून आवश्यक कागदपत्रे (आधार, शिधापत्रिका, मोबाईल क्रमांक) घेऊन शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांतर्गत पुढील सात दिवसांत 100 टक्के लाभार्थ्यांना कार्ड वाटप करावेत आणि अहवाल सादर करावा, असेही आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.काम असमाधानकारक; कार्डसाठी धडक मोहीम