पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात दोन-चार दिवसांत आचारसंहिता लागू होणार असल्याचे संकेत आज (दि.८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त बोलताना दिले. बारामतीत उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काहींनी इतर पक्षात पक्षप्रवेश केला. तर काहींनी आपल्या पक्षात परत घरवापसी केली आहे. आज (मंगळवारी) अजित पवार यांच्या उपस्थित बारामतीत उद्योग मेळावा पार पडला. यादरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन- चार दिवसात अचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली.