लहरी हवामानामुळे जांभळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या 20 ते 30 टक्केच उत्पादन असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यात जांभळांची आवक वाढून दर खाली येतील. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ते चढेच राहतील.
– शिवाजी भोसले, अडतदार, मार्केट यार्ड
जांभळांची विक्री दोन दिवस चालते. यंदा जांभळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. बाजारात एक किलो जांभळाची 400 ते 600 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दर जास्त असल्याने ग्राहकही कमी प्रमाणात खरेदी करीत आहेत.
– गणेश मल्हारी, विक्रेते, लष्कर