पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या वाढत्या झळा, निवडणुकांचा ज्वर, यामुळे सध्या वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रचार सभा, रॅली यांना जोर येणार आहे. उन्हाच्या तडाख्यातही सभांना गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचे प्रकार वाढू नयेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात मार्च महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात झाली. उन्हाच्या तडाख्यापासून काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करावेत, दुपारी कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास उपस्थित राहणार्या लोकांसाठी मंडपाची आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, असे नमूद करण्यात आले आहे. अतिश्रम करणारे, सातत्याने उन्हात प्रवास करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले यांत उष्माघाताच्या त्रासाचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
हेही वाचा