

पिंपरी : एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल रहाटणी शाळेची पहिलीच्या वर्गात शिकणारी गिर्यारोहिका शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या सहाव्या वर्षी पुन्हा एक अद्भुत कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले आहे. शतक गडकिल्ल्यांचे या तिच्या गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेतून तिने शेवटचा म्हणजेच 100 वा कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला सर केला आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी तिने तब्बल 100 गडकिल्ले पायथ्यापासून सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेत उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक शनिवार आणि रविवारी तिने महाराष्ट्रातील रायगड, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यांतील तब्बल 100 गिरीदुर्ग सर केले आहेत. विशेष म्हणजे तिने प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पवित्र मातीचा संग्रह केला आहे. ही माती आपल्या मावळ्यांच्या रक्तामुळे आणि शिवरायांच्या चरणामुळे पवित्र झाली आहे, अशी तिची धारणा आहे.
हेही वाचा