टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरातील विद्युत रोहित्रे चोरट्यांनी टार्गेट केली आहेत. रोहित्रे फोडून त्यातील तांब्यांच्या तारा चोरून नेल्या जात आहेत. नुकतीच इनामवस्तीमध्ये फत्तेश्वर मंदिरानजीकची दोन रोहित्रे फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. आठवडाभरात दोन घटना घडल्याने शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त करत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांना केली आहे. सध्या कांदा लागवड चालू असल्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. मात्र, विद्युत रोहित्रे फोडल्याने शेतकर्यांना पाणी असूनही त्याचा उपयोग करता येत नाही.
यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेले हे रोहित्र फोडीचे सत्र थांबायला तयार नाही. नवीन विद्युत रोहित्र आणणे म्हणजे खूप कठीण काम असून, शेतकर्यांना मोठे दिव्य पार करावे लागते. लोकप्रतिनिधी, महावितरण अधिकारी, कर्मचारी यांचे उंबरठे झिजवावे लागतात. तसेच तेथील सर्वांची वीजबिलांची वसुली झालेली असेल, तरच प्राधान्यक्रमाने नवीन रोहित्र मिळते. रोहित्रे फोडणार्या चोरांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. रोहित्र फोडणार्यांमध्ये स्थानिक चोरांचा समावेश किंवा चोरट्यांना या परिसराची खडान् खडा माहिती असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी चोरट्यांचा लवकर बंदोबस्त करावा; अन्यथा तीव— आंदोलन छेडण्याच्या इशारा शेतकर्यांच्या वतीने कवठे येमाईच्या सरपंच सुनिता पोकळे यांनी दिला आहेर्.ेंफ