लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेली गारपीट, अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसला. धुके व पाऊस यांपासून कांदा रोपे वाचविण्यासाठी मोठ्या फवारण्या कराव्या लागत असल्याने कांदा उत्पादकांचा खर्च वाढत आहे. धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत.