

हिंजवडी : आयटी परिसरातील नागरी समस्या कायमच लक्षवेधी ठरतात. मात्र आयटी परिसरातील पाणीप्रश्नदेखील मागील काही काळात ऐरणीवर आला आहे. याचाच परिणाम हिवाळी अधिवेशनात हिंजवडीसह परिसरात असलेल्या पाणी समस्येबाबत लक्षवेधी मांडण्यात आली.
माण ग्रामपंचायतीस पाणी मिळत आहे. मात्र, मागील काही वर्षांत पाण्याची वाढती मागणी पाहता नव्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून एमआयडीसीकडे याबाबत मागणी करण्यात आली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.
– अर्चना आढाव, सरपंच, माण ग्रामपंचायत
मारुंजी गावची पाण्याची गरज लक्षात घेता सक्षम आणि मोठ्या स्वरूपात पाणी योजना आवश्यक आहे. मुळशी प्रादेशिक पाणी योजना टप्पा क्रमांक 2 ही न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गावाच्या पाणी प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र पाणी योजना आवश्यक आहे.
– शिवाजी बुचडे पाटील, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती
हेही वाचा