Market Update : सीताफळ, पपईच्या भावात घट
पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. रविवारी आवक वाढल्याने सीताफळ आणि पपईच्या भावात घट झाली होती. आवक जावक सारखी असल्याने इतर बहुतांश सर्व प्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते. गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि. 10) केरळ येथून अननस 5 ट्रक, मोसंबी 50 ते 60 टन, संत्रा 60 ते 70 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबांची सुमारे 1500 ते 2000 गोणी, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, सीताफळ 70 ते 80 टन, सफरचंद दीड ते दोन हजार बॉक्स, चिक्कू 2 हजार बॉक्स आणि बोरांची 2000 ते 2500 गोणी इतकी आवक झाली, अशी माहिती व्यापार्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-400, मोसंबी : (3 डझन): 160-320, (4 डझन) : 80-160, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 40-150, गणेश : 10-30, आरक्ता 20-60, कलिंगड : 10-16, खरबूज : 15- 25, पपई : 5-10, चिक्कू (दहा किलो) : 100-500. सीताफळ (एक किलो): 10-40, पेरु (वीस किलो) 400-500, बोरे (दहा किलो) चमेली: 130-180, उमराण: 80-100, चेकटन : 450-500, चण्यामण्या: 650-700, सफरचंद – काश्मीर डेलिशियस: (15-16 कीलो) : 1200-1500, किनोर (25-30 किलो) : 3000-4000