पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणार्या लग्नांसाठी पथकांना वादनासाठी सर्वाधिक कामे मिळत असून, पथकांचा व्यवसाय आता उपनगर, ग्रामीण भागाकडे वळला आहे. लग्नसराईच्या सीझनला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून, कार्यालये, लॉन्स, सभागृहे हाऊसफुल्ल बुक आहेत. लग्नांमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या ब—ॉस बॅण्ड पथकांच्या वादनाला चांगला प्रतिसाद आहे. पण, तो उपनगर आणि ग्रामीण भागात. त्यानुसार पथके वादनासाठी जात आहेत. अस्सल बॉलिवूड गीतांपासून ते लग्नांवर आधारित गीतांपर्यंतचे वादन कलाकार करत आहेत. दरबार ब्रॉस बॅण्डचे इक्बाल दरबार म्हणाले, वादनासाठी आम्ही उपनगर आणि ग्रामीण भागात जात आहोत. पथकांचा व्यवसाय आता उपनगर, ग्रामीण भागाकडे वळला आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळे आता कामे मिळायला सुरुवात झाली आहे.