पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणारी शिक्षक भरती 2018 साली सुरू करण्यात आली. परंतु, 2023 साल उजाडले तरी भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यासाठी दोनदा अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. परंतु, गेल्या पाच वर्षांत शिक्षक भरतीचे घोंगडे भिजतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक पात्रताधारकांचा संताप अनावर झाला आहे. राज्यात शिक्षक भरती व्यवस्थित होत नसल्यामुळे काही याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या.