दौंड तालुक्यातून गेलेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाले. त्यानंतर रस्ता रुंद व मोठा झाला असून, वाहनांचा वेग प्रचंड वाढलेला आहे. परिणामी, अपघातांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महामार्गाचा कारभार सांभाळणार्या प्रशासनाला रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत कुठले गांभीर्य राहिले नसून, तातडीच्या उपाययोजनांबाबत कायम बोंबाबोंब असते. वाढत्या अपघातामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस ब्लॅकस्पॉट वाढत आहे. आतापर्यंत अनेक वाहनचालक, प्रवासी, नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला असून, अनेक जणांना अपंगत्व आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत पाटस टोल प्रशासन व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रशासन नेहमी कुंभकर्णी झोपेत असते.