तालुक्याच्या दक्षिण भागातील वरवडी खुर्द वरवडी डायमंड, वरवडी बुद्रुक, अंबाडे, बालवडी, पाले, पळसोशी बाजा रवाडी, धावडी, खानापूर हातनोशी, गोकवडी, नेरे, भोर या भागात सकाळी अवकाळी पावसाने सुरुवात केली असताना याचा भात पिकाला फटका बसला आहे. तर रब्बी हंगामातील पेरणीला फायद्याचा ठरला आहे. खरीप हंगामातील शेतकर्याच्या भात उत्पादनात घट होणार असल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकर्यांची मोठी धाकधूक वाढल्यामुळे भात पिकाची जमवाजमवी करण्यामध्ये मग्न झाले होत.