

जलजीवनावर वाढते शहरीकरण व औद्योगिकरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पाण्याचे रासायनिक गुणधर्म नष्ट झाले आहेत. त्यामुळे देशी वनस्पती, जलजीव हे नामशेष झाले आहेत. नदीठिकाणी बांधकामांचा राडारोडा आणून टाकल्याने नदीकाठावरची दलदल नाहीशी झाली आहे. पर्यावरणाविषयी जे कायदे आहेत. ते भंग करणार्यांवर योग्य ती कडक कारवाई करणे गरजेचे आहे.-सचिन पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ