

फौजदारी गुन्हा कायद्यांतर्गत मानहानी करणे हा जामीनपात्र, अदखलपात्र आणि आपसात मिटविण्याजोगा गुन्हा आहे. मानहानीची तक्रार थेट पोलिस अधिकार्याकडे करता येत नाही. परंतु, खासगी तक्रारीद्वारेच न्यायिक दंडाधिकार्याकडे केली जाते. न्यायदंडाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन त्या संबंधित व्यक्तीस समन्स बजावू शकतात व फौजदारी गुन्हा कायद्यांच्या प्रक्रियेनुसार कार्यवाही करू शकतात. न्यायिक दंडाधिकार्याच्या आदेशाशिवाय पोलिस मानहानीचा तपास करू शकत नाहीत.
महापुरुषांसह अन्य समाजाबद्दल बोलताना प्रत्येकाने सामाजिक भान ठेवले पाहिजे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे दुसर्यांच्या अप्रतिष्ठेसाठी वापरणे चुकीचे आहे. महापुरुषांबद्दल कठोर शिक्षेची तरतूद असणारा कायदा सरकारने लवकरात लवकर पारीत करावा. सध्या असणारे कायदे व तरतुदी अपुर्या असून, अशा प्रकरणात दोष सिध्द होण्याचे प्रमाण नगण्य आहे.– अॅड. अतुल पाटील,फौजदारी वकीललोकप्रतिनिधींबाबत सध्या हे प्रकार वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणात आरोप सिध्द होऊन शिक्षा झाल्यास त्याआधारे संबंधित व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करीत त्रास देण्याचा उद्देश असू शकतो. याखेरीज निवडणुकांच्या काळात शिक्षा झाल्याचा मुद्दा पुढे आणून त्याच्या मार्गात अडथळे आणण्याच्या उद्देशाने या स्वरूपाचे दावे दाखल करण्यात येतात.– अॅड. चिन्मय भोसले,फौजदारी वकील