

या रस्त्याचे काम नियमाप्रमाणे झाले आहे. मात्र, त्यावर रहदारी अधिक आहे. तसेच काँक्रिटीकरण केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीस लगेच खुला करण्यात आल्याने त्यास अधिक दिवस पाणी मिळाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ठेकेदाराला अद्याप साडेतीन कोटी रुपये बिल अदा केले नाही. त्याच्याकडून पॅचवर्कसह इतर कामे करून घेतली जातील. समिती गठित करून या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल.– जान्हवी रोडे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग