पुणे पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी करावी. कारण जिल्ह्यात 18 ते 29 वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी 12 ते 15 लाखांनी कमी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकार्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते.