जेजुरी : नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के | पुढारी

जेजुरी : नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के

जेजुरी : पुरंदर आणि बारामती तालुक्याची संजीवनी समजल्या जाणार्‍या नाझरे (मल्हार सागर) धरणात जून महिन्यापासून पाऊस न झाल्याने आजअखेर उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्याच्या खाली उरला आहे. या वर्षी जून-जुलै महिन्यात अतिशय कमी 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा संपुष्टात येऊन लागल्याने धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणार्‍या गावांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या वतीने तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अपुर्‍या पावसामुळे पेरण्या न झाल्याने शेतीकरीवर्ग हवालदिल झाला आहे. 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनेंतर्गत जवळपास 56 गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

हेही वाचा : 

Back to top button