पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दुपारी दोन तास बंद | पुढारी

पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दुपारी दोन तास बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ रात्री पावणे अकराच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. द्रुतगती मार्गावर कोसळलेली दरड हटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे ठीक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे वर मौजे आडोशी गावच्या हद्दीत किलोमीटर 41 जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वर पडला. रात्री उशिरापर्यंत दरड हटवण्याचे काम सुरु होते. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या असून एक लेन अजुनही बंद आहे. मात्र आता दुपारी दोन तास पुणे-मुंबई महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Back to top button