कर्नाटकचा निकाल देश बदलाची सुरुवात : राष्ट्रवादी | पुढारी

कर्नाटकचा निकाल देश बदलाची सुरुवात : राष्ट्रवादी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दिमाखदार विजय झाल्याने जनमत भाजपच्या विरोधात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पराभवासह दक्षिणेतील अखेरचे राज्यदेखील भाजपने गमावले आहे. कर्नाटक विधानसभेचा निकाल हा देशातील राजकीय वातावरण बदलाची सुरुवात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

एकीकडे देशातील मणिपूर जळत असताना देशाच्या पंतप्रधानांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली. ते निवडणुकीच्या प्रचारात रमले होते. प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ धार्मिक व विषारी मुद्द्यांकडे जनतेचे लक्ष वेधून वातावरण बिघडवण्याचे काम भाजपने केले. मात्र, जनतेने भाजपला मोठी चपराक मारत काँग्रेसच्या हाती सत्ता दिली, असेही जगताप म्हणाले

Back to top button